ऑपरेशन सिंदूर : नऊ दहशतवादी तळांवर भारताने चढवला हल्ला   

भारतीय सशस्त्र दलाने बुधवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. हे ऑपरेशन "सिंदूर" या नावाने ओळखले जाईल. सकाळी दहा वाजता लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात येईल ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूर कसे राबविण्यात आलं याची माहिती दिली जाणार आहे.
 
२०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि २०१९ मध्ये बालाकोट मध्ये झालेला हवाई हल्ला यानंतर सिंदूर हे ऑपरेशन सर्वात मोठा हवाई हल्ला ठरणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर अचानक रात्री हल्ला केल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरले आहे. सिंधू ऑपरेशन फक्त भारतीय हवाई दलाचे नाही तर लष्कराचेही ऑपरेशन आहे. आयएएफच्या लढाऊ विमानांबरोबर दुसरीकडे लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला आहे.
 
संरक्षण मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले.या पत्रकानुसार ज्या ठिकाणावरून भारता विरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली त्या नवठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले. भारतानेही युद्धाची तयारी जोरदार सुरू केली. आज मॉक ड्रिल ची घोषणा देशभरात करण्यात आली.
 
कोणती नऊ ठिकाणं होती लक्ष? 
 
भारताकडून बुधवारच्या रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीर मधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई हल्ले केले गेले. यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश होता 
 
१)बहावलपूर 
 
२) मुरीदके 
 
३) गुलपूर 
 
४) भीमबर 
 
५) चक अमरु 
 
६)बाग 
 
७)कोटली  
 
८)सियालकोट  
 
९)मुजफ्फराबाद

Related Articles